अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
अनन्यभावाने जो माझं स्मरण, चिंतन, पूजन करतो. मला भजतो, त्याच्या योगक्षेमाची चिंता मला वाहावीच लागते. मी त्याच्या दैनंदिन योगक्षेमाची काळजी घेत असतो.
श्रीमद्भगवद्गीतेतील सगळ्यात शेवटचा श्लोक मला नेहमीच मोहवून टाकतो. भगवंताचे सातत्यपूर्ण स्मरण हेच भवसागर तरून जाण्यासाठी उपयुक्त ठरतं. हा श्लोक मी एखाद्या मंत्रासारखाच मानतो. मला या श्लोकाचा अतिशय उत्तम अनुभव आला आहे. हा मंत्रच आहे. एका करांगुलीवर गोवर्धन पर्वत तोलून धरून भगवंताने गोकुळाचं रक्षण केलं. कारण, सबंध गोकुळाची अढळ श्रद्धा भगवंतांवर होती.
रोज ११ वेळा किमान आणि कमाल १०००पेक्षा अधिक वेळा या मंत्राचा जप करावा. ईशस्मरण करावं. कर्मसिद्धान्तावर विश्वास ठेवून शांतपणे आपलं विहीत कर्म करावं आणि चिंतामुक्त होऊन भगवंत खरोखरच योगक्षेमाची काळजी कशी घेतात त्याचा अनुभव घ्यावा.
- सचिन मधुकर परांजपे (पालघर)